Friday, December 25, 2015

चित्रपट बाजीराव मस्तानी


चित्रपट बाजीराव मस्तानी -                                                                                           २६ डिसेंबर २०१५

बाजीराव मस्तानी चित्रपटाचे प्रोमो पहिले तेंव्हा खरेतर  चित्रपट पाहण्याचा आमचा निर्णय झाला होता,,,पण आमची प्रतिज्ञा म्हणजे काही चाणक्याची प्रतिज्ञा नाहीचाणक्या च्या  घरात बाल हट्ट आणि स्त्री हट्टा ला स्थान नव्हतेआमचे तसे नाही … " To Be ओर Not To Be " मध्ये शेवटी To Be चा विजय झालाआणि काल अस्मादिकांनी सहकुटुंब सिनेमा पहिला.

"लोकतंत्र संख्या का खेल है" त्या प्रमाणे  "चित्रपट बॉक्स ऑफिस का खेल है" , त्या मुळेच काही गोष्टी घुसडल्या जाणार हे सत्यआणि त्या आहेत यात दुमत नाही

कुठलीही चित्रपट कलाकृती परिपूर्ण नसते , म्हणूनच कुठल्याही चित्रपटाला स्टार मिळत नसतात,,बाजीराव मस्तानी हि पण परिपूर्ण कलाकृती नाहीअसे असले तरी त्यात काही जमेच्या बाजू आहेत  आणि उणीवा तर आहेतच आहेत  ….

श्रीमंत बाजीराव पेशव्यांचे असामान्य कर्तुत्व , युद्ध निपुणता , राजकारणा वरील पकड आणि  मस्तानी वर असलेले प्रेम हे दाखविण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न.

सातारच्या छत्रपतीच्या दरबारातून बाजीरावा चे पेशवे होण्या पासून त्यांचा रावेर खेड मधील मृत्यू पर्यंतचा प्रवास तास ३५ मिनिटात दाखविण्याचा हा प्रयत्न

काही गोष्टी जमेच्या -

. "ग्रेट मराठा" हि उपाधी जरी नेहमी वापरली गेली तरी देखील , आज पर्यंत मराठी मुलुखात होऊन गेलेल्या योद्धे , स्वातंत्र्य सैनिक , राजे - महाराजे किंवा अजून कोणावर Bollywood ला सिनेमा काढण्याची गरज वाटली नव्हती
. सिनेमा नक्कीच भव्य दिव्य आहे
. बाजीराव च्या भूमिकेला न्याय देण्यात रणवीर सिंघ काही प्रमाणात यशस्वी झाला आहे
. दीपिका ने मस्तानी छानच रंगवली आहे , तिचे सौंदर्य , वागणे , अदाकारी ला जवाब
. खरे कौतुक आहे प्रियांका नि केलेल्या काशी बाई च्या भूमिकेचेखरे तर चित्रपटाचा पूर्ण Focus बाजीराव - मस्तानी असणे स्वाभाविक होते पण प्रियांकाने अतिशय ताकदीने हि भूमिका करून , काशी बाई च्या स्वभावाचे अनेक पैलू छान दाखवले आहेत.
राऊ वर  प्रेम करणारी अवखळ काशीबाईखानदानी पेशवीण बाई , आपला नवरा दुसर्या कोणाच्या प्रेमात पडला आहे हे समजल्यावर होणारी तिची  घालमेल, श्रीमंतांचा मृत्य समोर दिसत असताना तुटून पडलेली काशीबाई…  नवर्याच्या प्रेमा करिता मस्तानी ला स्वीकारणारी काशीबाई खरेच लाजवाब
. तन्वी आझमी ने केलेली राधाबाई (श्रीमंतांच्या मातोश्री ) पण लक्षात राहतात , पदोपदी मस्तानी चा दुस्वास , काशीबाईशी असलेले प्रेमळ नाते , पुत्र प्रेम….  केवळ बाजीराव च्या नसून आपण पूर्ण प्रजेच्या  मातोश्री असल्याची करून दिलेली जाणीवहे दाखविताना त्यांनी भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे 
. शनिवार वाड्याची भव्यता आणि सुंदरता खरेच पाहण्या सारखी आहे
. शनिवार वाड्यातील राजकारण , भाऊ बंदिकी दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे असे म्हणू शकतो
.हातचे राखून ठेवता केलेला खर्च चित्रपटाला  श्रीमंती देतो आणि एका उंचीवर नेउन ठेवतो
१०. सेपिया  शेड चित्रपटाला एक कलात्मकता देतो

आता काही खटकलेल्या गोष्टी -

.पिंगा या गाण्याची सिनेमात अजिबात गरज नव्हती, खानदानी पेशवीण असे नाचू शकते , हे मान्य होणे शक्यच नाही
. हे गाणे कथानका पेक्षा box office ची गरज म्हणूनच सिनेमात आले आहे
. या गाण्याच्या वेळेस काशीबाई चे नाचतानाचे उघडे पोट पाहूनधन्य तो दिग्दर्शक म्हणण्याची वेळ प्रेक्षका वर येते  
. हळदी कुंकवाच्या  च्या कार्यक्रमात नाचण्याची पद्धत मराठी साम्राज्यात कधीच नव्हती
. रणवीरसिंग चा अभिनय काही प्रसंगात अतिशय Loud होतो, एक दोन प्रसंगात तर दारू च्या अमला खाली असल्या सारखे जाणवते , हे अतिशय निषेधार्ह आहे      
. बाजीराव आणि मस्तानी चे एक मेकावर अतिशय निस्सीम प्रेम होते, सिनेमा मध्ये असे बरेच प्रसंग आहेत ज्यात बाजीराव चे प्रेम दिसून येते पण मस्तानी चे बाजीराव वरील प्रेम दिसण्याचे प्रसंग अभावाने आले आहेत, सिनेमातील तिचे बाजीराव वरील प्रेम दाखविण्या पेक्षा तिची झालेली उपेक्षा आणि त्याचा तिने केलेला सामना यावरच जास्त भर आहे
. चित्रपटातील सुरुवातीचे लढाई चे प्रसंग ठीक आहेत पण शेवटचा प्रसंग अतिशय कृत्रिम वाटतो , उलट दक्षिणे कडील सिनेमा सारखा अतिशयोक्ती पूर्ण वाटतो , ज्याची  अजिबात गरज नव्हती
. मस्तानी जेंव्हा समशेर ला जन्म देते तो पण प्रसंग अतिशय कृत्रिम वाटतो      

इतिहास समजावा म्हणून चित्रपट पहिला तर निराशाच होईल , एक कलाकृती किंवा ग्रेट मराठा पडद्यावर दाखविण्याच्या प्रयत्ना ला दाद देता येईल

माशी चहात पडली तर आपण चहा फेकून देतो पण तीच तुपात पडली तर आपण तूप फेकून देता , तुपातून माशी काढून फेकतो

या चित्रपटात माशी तर पडली आहेच

आता "चहा फेकायचा का माशी काढून फेकायची" हा ज्याचा त्याचा प्रश्न

बिपीन कुलकर्णी



  

Wednesday, December 16, 2015

विक्रम आणि वेताळ !!

विक्रम आणि वेताळ                                                                                 १६-१२-२०१५

झाडावर लोंबकाळत असलेले प्रेत, राजा विक्रमाने उचलले आणि , पाठीवर घेतले आणि तो पुन्हां स्मशानाकडे जाऊ लागला. प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला , “विक्रमा, का आयुष्यभर असा  सैरभैर झाल्या सारखा वागतो आहेस
तुझे आयुष्याचे ध्येय काय? तुला तरी माहिती आहे कातुझी पण अवस्था चार चौघा सारखी  होणार हे नक्की !”. तुला त्या दोघांची गोष्ट सांगू का , माझ्या मनात काही प्रश्न आहेत आणि ज्याची  उत्तरे सापडलि नाहीत ?

विक्रमाचे कुतुहुल चाळवले, त्याने वेताळाला त्या दोघांची ची  गोष्ट सांगायचा आग्रह केला. वेताळाने अट घातली की बोललास तर मी परत झाडाला लटकायला मोकळा , बोल कबूल ? विक्रमाने अट कबूल करताच वेताळ सांगु लागला;

का आटपाट नगरातील त्या दोघांची हि गोष्ट …  तो आणि ती म्हणजे वयाची चाळीशी पार केलेल्या आजच्या पिढीचे प्रतिनिधी , हि कहाणी त्या दोघांचीच नाही तर त्या संपूर्ण पिढीचीघरोघरी हीच कथा !
कथेची सुरुवात त्याचे आवडते लेखक पु काळे यांच्या एका वाक्याने करतो  -  " अंधारातील प्रवासा साठी आपण कायम कोणाचा तरी हात शोधत असतो आणि त्याच वेळेस आपलाही हात कोणाला तरी हवा असतो "
राजा या वरून तुला कल्पना आली असेल हि कथा एका नवरा बायकोची …. रूढार्थाने ज्याला संसार म्हणतो तो अंधारातील प्रवासच ना ?

एक मराठी कुटुंब , ब्राम्हण म्हणणे योग्य होणार नाही कारण आजची पिढी या वेताळाला लगेच असहिष्णू म्हणेल….

मराठी कुटुंबात चार चौघा सारखा वाढलेलागरिबी नव्हती तसेच श्रीमंती पण नव्हती ? आई आणि वडील नुसतेच सुशिक्षित नाहीत तर सुसंस्कृत … 

वडिलांचा धाकधाक असा कि वडिलांशी बोलताना  .. ..  ..  .. व्हायचे त्याचे, त्याला कारणही तसेच
याचा स्वभाव शांतखोडकर तर अजिबात नाहीपण अभ्यासात गती कमीकमी म्हणजे काय तर कधी पहिल्या -१० मध्ये आला नाहीत्या मानाने भावंडे हुशार त्यांनी पहिला नंबर चुकवला नाहीम्हणून शिक्षक आई वडिलांना तक्रार करायचेहाताची पाची बोटे कशी सारखी असणरकरंगळी ला जर का अंगठ्या सारखे ताकतवान हो म्हणले तर होऊ शकेल का ? असो

आई चा फार जीवआपले मुल थोडे वेगळे असले कि  तीचा जीव त्या मुला करिता जास्तच तुटतो नाती रडायची, समजवायची, त्याचा अभ्यास घ्यायचीपण त्याला हे आईचे आतल्या आत झुरणे कळायचे नाहीकदाचित वय नसेल तेवडिलांनी नकळत संस्कार केलेआयुष्य हा झगडा असतो हे त्यांच्या कडे पाहून तो शिकलाआई वडिलानी नकळत वाचनाचे संस्कार घातले.... 

आयुष्यात याचे कसे होणार हे मोठे प्रश्नचिन्ह होते ? आई वाडीला पेक्षा समाजालाच जास्त काळजी… 

नावे ठेवणारे आणि सल्ले देणारे खूप होते ?
पदवी पर्यंत शिक्षण घेवून हा नोकरी ला लागला …   

त्या दोघा मधली ती पण अशीच गरिबीत वाढलेलीमोठ्या कुटुंबात वाढलेली , वडील शिक्षककितिसा पगार असणारकुटुंब मोठेप्रत्येक गोष्टीत तडजोड करायची सवय लहान पणा पासून लागत गेलीती अभ्यासात हुशारकसे कोण जाणे पणे तिचे आयुष्याचे ध्येय एकच होतेबँकेत नोकरी करायची …  बँकेच्या परीक्षा देयला सुरुवात केलेलीसुरुवातीला अपयश आलेखचलीरडलीपण जे होते ते चांगल्या करिता होतेनंतर मोठे यश मिळणार होते

तर या दोघांचे  अगदी चहा , पोहे  खाऊन , पत्रिका बघून लग्न झाले
लग्न झाले तेंव्हा हा नुकताच पुण्यात आला होताआणि एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरी करीत होता ,,, पण पगार कितीसा असणारदोघांचा संसार सुरु झालाती छोट्या मोठ्या नोकर्या करीत होतीबँकेचे ध्येय डोळ्या समोर होतेचती नोकरी करून , संसार सांभाळून आला - गेला , पै पाहुणा सांभाळत होती …. काटकसरीने घर खर्च सांभाळत होती

याची ते नोकरीमहिन्याच्या शेवटची ओढाताणपगाराची वाट पाहणे११ - ११ महिन्याला घर बदलणेघर मालकांचे एके एके अनुभव घेणेह्याची गुरुवार तिची रविवार सुट्टीएक ना अनेक गोष्टी
हे त्यांच्याच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त असेच होत असते

नियती ला एकदा का आपले गुरु मानले कि सगळे प्रश्न सुटतात … कदाचित त्यांना ते समजले असावे …..उन जाऊन सावली येणार हे जसे निसर्ग चक्र तसेचआयुष्याचे पण चक्र असतेत्या प्रमाणे हे दोघे पुढे जात गेले
नोकरीत पायर्या चढत हा Vice  President पदा ला पोहोचला , तिने बँकेत Cleark पासून सुरुवात करून Manager पदावर पोहोचली

घर झाले, गाड्या घेतल्या , संसारात मुले आली ,,, सगळी हौस मौजकाय कमी ?

दोघांच्या आई वडिलांचे आशीर्वाद यांना ईथ पर्यंत घेवून आले… 

समाजाने त्यांना यशस्वी ठरविले

ज्यांनी नावे ठेवली ते सगळे लोक यांचे कौतुक  करू लागले ….

एवढे  सांगून वेताळ थांबला आणि राजा ला म्हणाला -

विक्रमा हि छोटीशी कथा त्यातील काही अनुत्तरीत प्रश्न तुला विचारतो  , तू त्याची उत्तरे देशील अशी अपेक्षा करतो -

. यश म्हणजे काय ? पैसा कमावणे  ,प्रसिद्धी मिळविणे, भौतिक सुखे  का अजून काही ?
. कोवळ्या वयात एखाद्या मुलावर शिक्का मारणे कितपत योग्य ?
. नियती म्हणजे काय ?

वेताळाने  अपेक्षेने विक्रमा कडे पहिले आणि उत्तर देण्या करिता राजा बोलू लागला -

वेताळा जशी सौंदर्याची व्याख्या प्रत्येकाची वेगळीतशीच यशाची व्याख्या प्रत्येकाची वेगळी…. जगात मधुबाले च्या सौंदर्याची भक्ती करणारे आहेत तसेच , राखी सावंत चे सौंदर्य आवडणारे पण लोक आहेतच ना … … … पण आज काल दुर्दैवाने पैसा आणि प्रसिद्धी म्हणजे यश झाले आहे…. मधुबालाचे सौंदर्य इतिहास जमा होत आहेतुझ्या कथेतील त्या दोघांकडे पैसा, गाडी , घर , प्रतिष्ठा नसती तर समाजाने त्यांना यशस्वी म्हंटले असते काविचार करायला लावणारा प्रश्न आहे हाआणि याचे उत्तर कोणाकडेच नाही

त्या मुळेच या पिढीला सतत सैर भैर व्हावेच लागते !!

आता तुझ्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर देतो , कोवळ्या वयात एखाद्या मुलावर शिक्का मारणे अजिबात योग्य नाहीतारे जमीन पर सिनेमा आठवअसे जेंव्हा समाज वागतो तेंव्हा ते कोवळे वय आणि त्याची आई भरडली जातातया कथेतील त्याला किंवा त्याच्या आई ला विचारून पहा , एक तरी प्रसंग ते विसरू शकले असतील  का ? पण त्याला कवटाळून बसता आणि कटुता ठेवता पुढच्या आयुष्यात चालत राहणे महत्वाचे … 

कथेतील त्याला ते जमले का ? याचे काही उत्तर तुझ्या कथेत मिळाले नाही ….

आता तिसरा प्रश्न , नियती म्हणजे काय ? याचे उत्तर म्हंटले तर अवघड म्हंटले तर सोपे … 

तुझ्याच कथेतील उदाहरण , त्याचे आयुष्यात पुढे कसे होणार हि एके काळची चिंता पण तोच आज समाजाच्या दृष्टीने यशवी ? आहे कि नाही नवलयालाच नियती म्हणतात
नियती कधी कशी वागेल तुम्ही सांगू शकत नाही, ती तुमच्या आयुष्यासोबत सावली सारखी चालत असतेकधी पुढे तर कधी मागे …. पण सतत असते हे मात्र नक्कीवेताळा पण कसे आहे ना , माणूस हा फार क्रुतग्न असतोवाईट प्रसंगी  नियती ला दोष देवून मोकळा होतो, पण तेच  सुखाच्या वेळी नियती ला विसरतोनियती हा खेळ आहे  … तिच्या खेळाला  धैर्याने ,संयमाने तोंड द्यायचं आणि विस्कटलेला  डाव सावरायचा आणि पुन्हा उभं राहायचं . कधी कधीतरी नियतीचे फासे आपल्या बाजूने नक्कीच पडतील .....हे ज्याला कळाले तो यशस्वी

तुझ्या कथेतील पात्रा चे वागणे कसे आहे  ते तू नाही सांगू शकलास ….

वेताळा कोणाला हि सल्ले देणे सोपे असते रेपण ती वेळ स्वतः वर आल्यावर त्या सल्ल्या तील फोल पण कळते ….

तू कथेची सुरुवात पु च्या वाक्याने केलीस आता मी शेवट त्यांच्याच वाक्याने करतोगणिताच्या उत्तरा सारखी आयुष्या कडून आपण अपेक्षा करीत असतोउत्तर मिळाल्याने जास्त दुखी होतोतुझ्या कथेतील त्या दोघांना मिळाली का उत्तरे आज पर्यंत ?

एवढे बोलून विक्रमाने वेताळा कडे पहिले , वेताळाची शंका निरसन झाली असावी हि अपेक्षा ….
विक्रमादित्याचे बोलणे संपताच वेताळ खांद्यावरून उडाला थेट वडाच्या पारंबीला लटकू लागला. सात मजली हास्य करत म्हणालाविक्रमा, तू बोलसास आणि फ़सलास ! मी परत मोकळा झालो ! पण तुझी उत्तरे बरोबर आहे …. राहता राहिला माझ्या कथेतील पत्राच्या बाबतीत तू विचारलेले प्रश्नांचा , त्याची  उत्तरे वाचकच देतील….

शांतपणे विक्रमादित्य स्मशानाच्या बाहेर चालू लागला ….


बिपीन कुलकर्णी