Saturday, December 2, 2017

युवराज , जानवे आणि बेगडी समाजवाद !!

युवराज , जानवे आणि बेगडी समाजवाद !!

सध्या युवराजचे जानवे प्रकरण सोशल मीडिया मध्ये गाजत आहे ... त्या मुळे एकूणच जानव्याला नकळत ग्लॅमर आले ... असे काही झाले कि मग त्या वर विनोद किंवा खिल्ली उडवणे ओघाने येतेच ... तसे ते जानव्याच्या बाबतीत पण झाले !!!

ज्यांचा अध्यात्म्या वर आणि बरोबरीने शास्त्रा वर विश्वास आहे त्या प्रत्येकाला जानवे घालायचा अधिकार आहे .. आपल्या अध्यत्मा मध्ये प्रत्येक क्रियेला शास्त्रा चा अधिकार आहे ...

जानव्या मागचे मी शास्त्रीय कारण सांगतो , त्या पूर्वी बेगडी समाजवादी "साथी" विनोबाजी चे जानवे तोडण्याचे उदाहरण देऊन अप्रत्यक्ष पणे जानव्याला विरोध करतात ??

विनोबाजी चे जानवे तोडण्याचे किंवा अग्नीला अर्पण करण्याचे उदाहरण देऊन विनोबा नि केले म्हणून याला थोतांड ठरवायचे असेल आणि विनोबा म्हणजे काळ्या दगडा वरची रेष असेल तर  मग विनोबा जी नि जो आणीबाणी ला अप्रत्यक्ष पाठिंबा दिला त्या बाबतीत आपले काय मत आहे ?
विनोबाजी महान होते .. त्यांच्या प्रत्येक कृती मागे स्वतः चे असे काही तत्वज्ञान होते ... ते समजायची आपली कुवत नाही ... त्या मुळे त्यांच्या कृती चा आपल्या सोयीचा अर्थ लावणे हा बेगडी पणा आहे ...
युवराजांचे किंवा त्या पक्षाचे स्वतः ला जानवे धारी म्हणणे जितके ढोंगी आहेत त्या पेक्षा जास्त ढोंगी त्यांना पाठिंबा देणारे समाजवादि !!!

डावी किंवा चंद्र नाडी तटस्थ असते. ती प्रत्येक कर्म करीत असताना व्यक्तीला तटस्थ ठेवते. त्या मुळे इतर वेळेस जानवे डाव्या खांद्या वर ठेवून  सव्य केले जाते.
म्हणजे प्रत्येक कर्म करीत असताना तटस्थता यावी हे साधे कारण ,,,
पण त्याच वेळेस  उजव्या खांद्यावर सूर्य नाडी असते . सुर्य नाडी कर्तव्य दक्ष असते आणि कर्तव्य पार पाडण्यास भाग पाडते अथवा प्रवृत्त करते, म्हणून श्राद्ध विधी करीत असतना अपसव्य केले जाते...

जानवे म्हणजे साधा धागा जो नाडीला प्रवृत्त करण्याचे काम करीत असतो !!!
हे जानव्या मागील शास्त्रीय कारण !!!

ज्यांना अध्यात्म कशाशी खातात हे कळत नाही त्यांच्या कडून काय अपेक्षा करणार !!!

- बिपीन कुलकर्णी

.